रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले संगमेश्वर हे कसबा संघमेश्वर म्हणून ओळखले जाते . त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत , त्या म्हणजे चालुक्यकालीन श्री कर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य .
'कसबा' हा फारसी शब्दाचा अर्थ 'वस्ती' .'संगमेश्वर' गावचे खरे नाव नाव इसवी सनापूर्वी महाराष्ट्र मध्ये जाईन आणि लिंगायत धर्मीय राज्य होती त्यापैकी जैन पंथीयांची राजधानी कपिल तीर्थ कोल्हापूर येथे होती परंतु संगमेश्वर हे त्यांचे राज्यकारभाराचे प्रमुख केंद्र होते त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सूर्यवंशी घराण्याचे राज्य आले त्यांच्यापैकी एका राज्याची राजधानी संगमेश्वर येथे होती .
गुजरातचा चालू त्या ठिकाणी इसवी सन १०६४ च्या सुमारास राज्य करत होता. तो कदम बराच जावई होता त्यांनी त्या काळात दहा हजार सुवर्ण मुद्रा खर्च करून तेथे शिवमंदिर बांधले ते त्याच्या नावाने कर्णेश्वर शिवमंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले . ते मंदिर शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे मंदिराची रचना हेमाड पंथीय असल्याचे म्हटले जाते .मात्र हेमाद्री तथा हेमाड पंडित तेराव्या शतकातील आहे. त्यामुळे ते मंदिर हेमाड पंथी असू शकत नाही. प्रत्यक्षात ते भूमीच शैलीतील मंदिर आहे . श्री कर्णेश्वर मंदिर सुमारे हजार वर्षानंतरही सुस्थितीत पाहण्यास मिळते. सुमारे 400 चौरस मीटर क्षेत्रात काळा पाषाणात कोरीव काम केलेले असे हे मंदिर कसब्याचे पौराणिक महत्त्व टिकवून आहे.
कर्णराजाने कर्णेश्वर पूजा आर्चेचा वेगवेगळ्या कामासाठी सात गावे दिली होती . धर्मकार्यार्थ-धर्मपुर (धामापूर),सुपारीसाठी गुणवल्लीका , भेट म्हणून देवजी भूचल, तुपासाठी शिवनी (शिवने) , यज्ञासाठी लवल(लोवले), फळांसाठी धामनी (धामणी) धर्मसेवकांसाठी करंबव (कळंबस्ते), निवासार्थ आम्रवल्ली (अत्रंवली), त्यांपैकी गुणवल्लिका आणि भूचल या गावांचे संदर्भ सापडत नाहीत. कर्णराजाने करणेश्वर मंदिराच्या निमित्ताने त्यावेळी 360 प्रसाद म्हणजे मंदिर बांधली होती. त्यातील काही मंदिरे त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. त्यांमध्ये कुंभेश्वर,सोमेश्वर, काशीविश्वेश्वर,रावणेश शंकर, जलयुक्त नंदिकेश (संगम मंदिर)व कालभैरव यांचा समावेश आहे .
कोकण परिसरात वैष्णवपंथीयांचे प्रमाण अधिक आहे. त्यांनी नंतरच्या काळात कर्णेश्वर मंदिराला कळस चढवला असावा. कारण सबंध मंदिर एका दगडात आहे. कळस दगड, माती आणि विटा यांनी बांधलेला आहे. त्या काळात देवळे दगडात कोरली जात होती, त्यांचे कळस माती-विटांनी तयार झालेले नसत. वैष्णवपंथीयांनी बांधलेल्या देवळांना कळस उंच असतात. पण दक्षिणेकडील व पंथी यांनी बांधलेल्या मंदिरांना तसे उंच कळत नसतात . कर्णेश्वर मंदिरात पावसाचे पाणी गळत होते, म्हणून 2003-04 यावर्षी मंदिराचे तीन छोट्या कळसांमध्ये थोडी दुरुस्ती करण्यात आली . तेव्हा ते कळस दगडमाती, विटांचे आहेत आणि त्यांना गुळ आणि चुना यांचे प्लास्टर करण्यात आले आहे ही बाब स्पष्ट झाली .
कळमेश्वर मंदिरात आतील बाजूच्या दगडात देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात. मंदिरावर जे चार कळस आहेत ते खालच्या बाजूने झुंबरा सारखे कोरण्यात आले आहेत. मूळ मंदिर हे कळस रहित होते. नंतरच्या काळात कधीतरी त्यावर कळस चढवण्यात आले. त्यातून पावसाचे पाणी गळते, म्हणून त्या कळसांचा जिर्णोद्धार करण्यात आला. त्याखेरीज त्या मंदिराच्या जिर्णोद्धार करण्याची वेळ आलेली नाही. ते मंदिर आहे तसेच सुबक दिसते. आता हे मंदिर पुरातत्व खाते अंतर्गत राज्यसंरक्षित करण्यात आले आहे .
लेख - निबंध कानिटकर
विश्वस्त,कर्णेश्वर मंदिर-संगमेश्वर
कोंकणातील पुरातन वास्तूंतील सर्वात देखणे "कर्णेश्वर मंदिर"