कनकादित्य मंदिर (Kankaditya Mandir)

Payal Bhegade
09 Jan 2024
Devotional

श्री कनकादित्य मंदिर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावातील प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे. कशेळी हे गाव रत्‍नागिरी शहरापासून दक्षिणेस ४० किलोमीटर, पावस पासून दक्षिणेस २४ किलोमीटर आणि राजापूर शहरापासून पश्चिमेस ३२ किलोमीटर अंतरावर कशेळी गाव वसले आहे.

आदित्य म्हणजे सूर्य. संपूर्ण भारतात फारच थोडी सूर्यमंदिरे आहेत. ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. प्रभासपट्टण म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे वसतिस्थान होय. (प्रभासपट्टण जवळच बारा ज्योतिरलिंग पैकी एक सोरटी सोमनाथचे प्रसिद्ध मंदिर आहे.)

१२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सुचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले.

ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले.

कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती. तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्य मूर्ती आली आणि भगवान सूर्य नारायनाने कनकेला म्हनाले कि तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध त्यात माझी स्थापना कर. कनकाबाईने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली मग ग्रामस्थांनाच्या मदतीने ती सूर्य मूर्ती गावात आणली गेली व स्थापना केली. त्या कनकाबाई मुळे घडले त्यामुळे कनकेचा आदित्य म्हनून कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले.

किनाऱ्यावर ज्या गुहेत कनकादित्याची मूर्ती सापडली त्यास 'देवाची खोली' म्हणतात. गावातील कोणी माहितगार बरोबर असेल तर येथे न चुकता पोहचता येते. समुद्रापासून साधारण १५ फूट उंचीवर काळ्या पाषाणात ही नैसर्गिक गुहा आहे जवळजवळ ३०० माणसानं पेक्षा जास्त माणसे यात बसू शकतील एवढी मोठी ही गुहा आहे. याठिकाणी आल्यावर याची भव्यता लक्षात येते. पण नाहक धाडस करू नये. कारण येथे जाणे आणि परत येणे अत्यंत अवघड आहे. अलिकडे येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने सनसेट पॉइंट (सूर्यास्त) पहाण्याची उत्तम व्यवस्था केली आहे.

मंदिर साधारण ९०० वर्षे प्राचीन आहे. पूर्णतः अस्सल कोकणी कौलारू स्थापत्य शैली येथे पहायला मिळते. मंदिराचे अंतरंग खूपच सुंदर असून लाकडी खांबावर नक्षी व वेलबुट्टी केलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर आणि छतावर विविध देव-देवता लाकडावर कोरलेल्या आढळतात. यामध्ये प्रामुख्याने कार्तिक, वरुण, श्रीकृष्ण, वायू, अग्निनारायण, शेषशायी विष्णू तसेच समुद्रमंथन आणि दशावतार या पौराणिक कथा प्रसंग चित्रीत केले आहे.

रथसप्तमी उत्सव हे कनकादित्य मंदिरात माघ शु.सप्तमी ते माघ शु.एकादशी असा पाच दिवस असतो. कशेळी आणि आसपासच्या गावातील सर्वात महत्त्वाचा उत्सवाचा हा काळ आहे.या रथसप्तमी उत्सवात सर्वात आकर्षण म्हणजे कनकादित्य आणि कालिकादेवी यांचा लग्नसोहळा अगदी आवर्जून बघण्यासारखा हा सोहळा असतो.

कालिकादेवी ही कशेळी गावापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या काळीकावाडीची. कालिकादेवीला धरून सहा बहिणी. कालिकादेवी, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, भगवतीदेवी आणि जाखादेवी. या सर्व देवी कशेळी गावाच्या आसपासच्याच आहेत. यात सर्वात प्रसिद्ध महाकाली मंदिर (अडिवरे) अगदी आवर्जून पाहण्यासारखे मंदिर आहे.

कालिकादेवी ही या सर्व बहिणीत धाकटी महालक्ष्मी,महाकाली,महासरस्वती आणि भगवतीदेवी ह्या कालिकादेवीला जाखादेवी साठी वर संशोधन करायला पाठवतात. पण कनकादित्यला पाहताचक्षणी कालिकादेवी कनकादित्याच्या प्रेमात पडते आणि कनकादित्यही कालिकादेवीच्या प्रेमात पडतो.
मग पुढे त्यांचं लग्न ठरतं. जाखादेवीला आपल्या धाकट्या बहिणीचा खूप राग येतो आणि ती तिचं तोंड न बघण्याची प्रतिज्ञा करते. आणि लग्नालाही उपस्थित राहत नाही.

रथसप्तमी उत्सवात लग्नसोहळावेळी मोठी बहिण महाकालीला मानाचे सरंजाम पाठवले जाते.भगवतीदेवी पाठराखन म्हणून येते. कालिकादेवीची पालखी ज्यावेळी कशेळीकडे कनकादित्य मंदिराकडे जात असते त्यावेळी वाटेत जाखादेवीचे मंदिर लागते. मंदिरासमोरून पालखी जात असताना जाखादेवी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. (कारण जाखादेवीने आयुष्यभर कालिकादेवीचे तोंड न बघण्याची प्रतिज्ञा केली होतीना म्हणून.) यामुळे ही प्रथा आजही पाळली जाते. ह्या लग्न सोहळ्याचं अजून एक खास वैशिष्ट म्हणजे हुंडा पद्धत सर्व साधारणपणे सगळीकडे मुलीकडील मंडळीनी मुलाकडच्या मंडळींना हुंडा देतात.पण येथे उलटे आहे. मुलाकडच्या म्हणजे कनकादित्याकडच्या मंडळींना वधुकडच्या म्हणजे कालिकादेवीच्या मंडळींना हुंडा म्हणून शिधा द्यावा लागतो.