इ. स. १६६४ हा काळ तास राजकीय उलथापालथीचा काळ होता. दिल्लीच्या औरंगजेब बादशाहने देशात उच्छाद मांडला होता. गोव्यात राज्य करणारे पोर्तुगीज आणि व्यापाराच्या निमित्ताने देशात आलेले इंग्रज यांना या महाराष्ट्र देशी मराठ्यांचे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची धडपड पाहावत नव्हती. हे तीनही शत्रू एकत्रितपणे महाराष्ट्रातील लोकांना त्रास देत होते.
जमिनीवरच्या शत्रूचा जसा आपल्या राज्याला धोका आहे तास जलमार्गाने येणाऱ्या शत्रूचाही धोका आहे हे ओळखून शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर एक जलदुर्ग बांधण्याचे निश्चित केले. त्यानुसार २५ नोव्हेंबर १६६४ या दिवशी किल्ल्याचा भूमिपूजन समारंभ मोरयाचा धोंडा येथे पार पडला.
या किल्ल्याचे बांधकाम ३ वर्षे चालले. या किल्ल्याच्या बांधणीसाठी तब्बल १ कोटी रु. खर्च आला. ४८ एकर क्षेत्रात पसरलेल्या या किल्ल्यात जो तट बांधण्यात आला आहे. त्या तटाची उंची २० – २२ फूट आहे तर काही ठिकाणी ३० – ४० फूट आहे. या तटांना ५२ बुरुज आहेत. या किल्ल्यावर १६९५ साली १६९५ साली छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले शिवाजी महाराजांचे मंदिर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर भारतात याच किल्ल्यावर आहे. या मंदिररतील महाराजांची मूर्ती पद्मासनावर बसलेली असून एका हाताने आचमन करीत आहे तर दुसरा हात गुढग्यावर आहे. हातात कडी आहे. शिवाजी महाराजांची हि मूर्ती पन्हाळगडावर बनविण्यात आली असे सांगण्यात येते.
या मंदिराचा सभामंडप कोल्हापूर संस्थानने बांधला. प्रवेशद्वारावर तटाच्या आतील बाजूस मारुतीची घुमटी आहे. या किल्ल्याच्या तटावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चुन्यात उमटविलेले हस्त आणि पद चिन्ह आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस तटावर या घुमट्या आहेत. तटाची एकूण लांबी ३ कि. मी. आहे.
शिवराजेश्वर मंदिर